कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या देशमुख होम्स परिसराचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे आश्वासन माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी नागरिकांना दिले आहे.
कल्याण ग्रामीणमधील टाटा नाका येथील देशमुख होम्स येथे तिन हजार कुटुंबांना गेल्या ५ वर्षापासून पाणी समस्या भेडसावत आहे. देशमुख होम्स च्या रहिवाशांना पाण्याच्या समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. कल्याण - डोंबिवली महानगरपालिकाक्षेत्रामध्ये शहरी भागात व्यवस्थित पाणीपुरवठा सुरु असून केवळ देशमुख होम्सला पाणी समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी कुणाल पाटील यांनी याठिकाणी भेट देऊन नागरिकांसोबत पाणी प्रश्नांसं
0 Comments