कल्याण : एसएसटी महाविद्यालयात जिल्हास्तरीय पाच दिवसीय नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून विजय जाधव (उपसंचालक,नागरी संरक्षण विभाग नवी मुंबई जिल्हा ठाणे), अतुल जगताप (सह उपसंचालक, नागरी संरक्षण विभाग नवी मुंबई जिल्हा ठाणे), डॉ. पुरस्वानी (चेअरमन आणि संस्थापक प्राचार्य, एस. एस. टी. महाविद्यालय), प्रा.जीवन विचारे (एनएसएस ठाणे जिल्हा समन्वयक व एस.एस.टी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य) एनएनएसचे विभागीय समन्वयक प्रा.निनाद कासले आणि डॉ संजय जॉयभाय हे उपस्थित होते. शिबिरात अतुल जगताप यांनी प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळली. या शिबिरात ठाणे जिल्हयातील २२ महाविद्यालयामधून १३९ स्वंयसेवक सहभागी झाले होते.
या शिबीरात रा.से.यो.च्या स्वयंसेवकांना नागरी संरक्षण कायदा, उद्दिष्टे, कार्यपद्धती, युद्धप्रसंगी स्वयंसेवकांची कर्तव्ये आणि कार्य, बॉम्बचे प्रकार, रेडिएशन त्याचे दुष्परिणाम याची माहिती व्याख्यांनांद्वारे अतुल जगताप यांनी दिली. तसेच या पाच दिवसीय कार्यशाळेत रा.से.यो.च्या स्वयंसेवकांना प्रथमोपचार, बँडेज बांधणे, स्टेचेर बनवणे, दूरसंचार विविधप्रसंगी उपयोगात येणाऱ्या गाठी, अग्नी शमन पद्धती, बिल्डिंगवरून खाली उतरणे इतर गोष्टींचे प्रशिक्षणही देण्यात आले.
हे प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्याकरिता एसएसटी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी योगेश पाटील, अंकित उपाध्याय, अनिल तेलिंगे, मयूर माथूर आणि संजय परटोले तसेच रमेश सरोज, निशांत मेश्राम, निकिता भोईर आणि इतर स्वयंसेवकांचे योगदान लाभले.
0 Comments