भिवंडी दि 9(प्रतिनिधी ) शहर व ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरु असून आज पहाटेच्या सुमारास पुन्हा लाखोंचे भंगार साठवून ठेवलेल्या गोदामांना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आतापर्यत १७ गोदामे जळून खाक झाली आहे.
भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरातील फातमा नगर भागात भंगारांची गोदामे आहेत. या गोदामांना आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास अचानक लागली भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांसह पाण्याच्या टँकरने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते.
मात्र तोपर्यत आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल १७ भंगार गोदामे पडल्याने जळून खाक आहे. या गोदामात कापडाच्या चिंध्या,लोचन,प्लास्टिक पुठ्ठा मोठ्या प्रमाणावर साठविल्याने आग अधिकच भडकून लगतच्या इतरही गोदामांना त्याची झळ पोहचली आहे.
मात्र आगीचे कारण अजून अस्पष्ट असून आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून या ठिकाणी सद्या कुलिंग काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
0 Comments