कल्याण : नवीन विद्यापीठ कायद्यातील राजकीय हस्तक्षेपाबाबत अ.भा.वि.प.ने नागरिकांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबविली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने अंबरनाथ पूर्व येथील रहिवाशांना नवीन विद्यापीठ कायदा व त्यात चाललेला राजकीय हस्तक्षेप याबद्दल माहिती देऊन अभाविप अंबरनाथ शाखेकडून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या अभियानात दीडशेहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी सही करून अभाविपच्या मागणीला संमती दर्शवली.
"शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अभाविप राजकीय पक्षांना अजिबात थारा देणार नाही; आणि जोपर्यंत नवीन विद्यापीठ कायदा मागे घेत नाही तोपर्यंत अभाविप तीव्र आंदोलन करण्यास सुद्धा मागे हटणार नसल्याची प्रतिक्रिया श्रेया कणसे यांनी दिली.
0 Comments