दिव्यातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा गरजेच्या निरंजन डावखरे...
दिवा , प्रतिनिधी :- दिव्यातील आरोग्य केंद्राचा प्रश्न आपण येणाऱ्या अधिवेशनात उपस्थित करणार असून येथील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्यसुविधा मिळण्यासाठी भाजप आग्रही आहे अशी ठाम भूमिका भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड. निरंजन डावखरे यांनी दिवा दौऱ्या दरम्यान व्यक्त केली.
दिव्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी ठाणे भाजपच्या पदाधिकारी यांनी नुकताच दिवा शहराचा दौरा केला.या वेळी पालिका व सत्ताधारी सेनेच्या कारभारावर निरंजन डावखरे यांनी सडकून टीका केली.दिवा शहरात पाण्याची समस्या गंभीर असून देखील नागरिकांना पाणी देण्याचे नियोजन अद्याप पालिका आणि सत्ताधारी शिवसेना करू शकले नाहीत असा आरोप डावखरे यांनी केला आहे.
नागरिकांना गृहीत धरण्याचे काम केले जात असून दिवा शहरासाठी महत्त्वाचे असणारे आरोग्य केंद्र लवकरात लवकर झाले पाहिजे,त्यासाठी आरक्षित भूखंड पालिकेने ताब्यात घेतला पाहिजे यासाठी हा विषय येणाऱ्या अधिवेशनात उपस्थित करणार आहे अशी माहिती निरंजन डावखरे यांनी दिली आहे.
यावेळी त्यांच्या बरोबर भाजप गटनेता संजय वाघुले,नगरसेवक कृष्णा पाटील,जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील,कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे,विजय भोईर,मंडळ अध्यक्ष आदेश भगत,सचिन भोईर,रोशन भगत,जयदीप भोईर,प्रशांत आंबोनकार,विजय वायदांडे,आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment