गोरसई -सावंदे ग्रा.पं.माजी सरपंच तथा हभप गजानन केणे यांचे दुःखद निधन
भिवंडी , प्रतिनिधी : तालुक्यातील तत्कालीन ग्रुप ग्रामपंचायत गोरसई - सावंदे ग्रा.पं.माजी सरपंच तथा ह.भ.प.गजानन पदू केणे (७४)यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.वैकुंठवासी केणे यांनी गोरसई - सावंदे ग्रामपंचायतीचे १९८५ ते १९९५ असे दहा वर्षे बिनविरोध सरपंचपद भूषवले होते.त्या कार्यकाळात त्यांनी दोन्ही गावचा चांगला करभार व विकास करण्यात हातभार लावला होता.
वैकुंठवासी ह.भ.प.तथा माजी सरपंच गजानन केणे यांनी गोरसई गावात ३७ वर्षांपासून सुरू असलेला अखंड हरीनाम सप्ताह चालू करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.ते गेले तीस वर्षे गावातील मालकरी महिला मंडळासोबत पंढरपुर,आळंदी,नेवासा,तुंगारेश् वर, त्र्यंबकेश्वर,गणेशपूरी वारीमध्ये नित्यनियमाने सहभागी होत असत.ते खूपच सत्यवादी विचाराचे होते.त्यांच्या स्वर्गवासाने गोरसई गावातील वारकरी संप्रदायाची खूपच हानी झाल्याने शिवसेना युवासेना उपतालुका प्रमुख कल्पेश केणे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
गोरसई -सावंदे ग्रा.पं.माजी सरपंच तथा हभप गजानन केणे यांचे दुःखद निधन
Reviewed by News1 Marathi
on
December 15, 2020
Rating:

Post a Comment