भिवंडी, प्रतिनिधी : आगीचे सत्र सुरूच असून सकळाच्या सुमारास शहरातील खोका कंपाऊंड परिसरामध्ये असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.भिवंडीतील मनसुख जाखरिया यांच्या मालकीचा कल्याण नाका परिसरातील खोका कंपाऊंडमध्ये यंत्रमाग कारखाना आहे.
या कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा साठवून ठेवण्यात आला आहे. तर कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत. आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली होती. हि आग एवढी भीषण आहे कि कारखानाच्या छताचे पत्रे तुटून हवेत उडत होते. त्यामुळे आजूबाजू राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खबद्रारीचा उपाय म्हणून अग्निमशन दलाच्या जवानांनी पोलिसांच्या व स्थानिकांच्या मदतीने रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हवलुन त्यांच्या घरातील गॅस सिलेंडरही काढण्यात आले.
दरम्यान, या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी २ तास लागणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली असून . मात्र आगीचे कारण अष्पष्ट ,अद्यापही असून आतापर्यत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल असून आगीवर दोन तासांनी नियंत्रण मिळवले आहे.
Post a Comment