सात वर्षांपूर्वी डोंबिवलीत धावली होती `डबल डेकर`बस
डोंबिवली | शंकर जाधव : मुंबईतील प्रत्येकाने`डबल डेकर`बसने नक्कीच प्रवास केला असेल.या प्रवासाचा आनंद मिळावा म्हणून मुंबईच्या धर्तीवर मनसेने डोंबिवलीतील प्रथमच `डबल डेकर` सुरु करण्याचा प्रयत्न केला.सात वर्षापूर्वी मनसेकडे परिवहन समिती सभापती पद असताना डोंबिवलीकरांनी शहरातील रस्त्यावर `डबल डेकर`बस धावताना पहिली होती. डोंबिवली सारख्या वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरात अशी बस चालवणे हे खरे तर दिव्यच होते.बस सुरु झाल्याचे पाहून सर्व डोंबिवलीकर सुखावले होते. पण हा आनंद निकृष्ट दर्ज्याच्या काही तासंपुरता राहिला. त्यानंतर आजतागायत डोंबिवलीत पुन्हा `डबल डेकर`बस धावली नाही. आजही परिस्थिती काही बदललेली नाही.परंतु मनसेने विकासाचे स्वप्न पाहिले होते ते थोड्या प्रमाणात का होईना पूर्ण केले.
त्यावेळचे सभापती राजेश कदम आणि सर्व सदस्यांनी मिळून विशेषतः इरफान शेख यांनी मिळून एक प्रयत्न करण्याचे ठरविले होते. या शहरातून जिथे वाहतुकीस गर्दी होते व ज्या इतर शहरांमध्ये नोकरीनिमित्त जास्तीत जास्त प्रवासी जातात जातात त्यांना सुसह्य प्रवास व्हावा ह्यासाठी `डबल डेकर` बस, ज्या बेस्टच्या मुंबईला धावतात त्या धर्तीवर डोंबिवली-वाशी, डोंबिवली-ठाणे अशा डबल डेकर बस आपण सुद्धा सुरू कराव्यात आणि त्यातून कल्याण-डोंबिवलीकरांना सुखाचा प्रवास व्हावा, यासाठी मुंबईहून खास डबल डेकर बस मागवून सन २०१३-१४ डोंबिवली पूर्वेकडी
त्यावेळी सोशल मिडीया नसल्याने लागलीच वेबचॅनल, युट्युब आणि फेसबुकला ही बातमी व्हायरल होण्याचा प्रश्नच नव्हता.नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर या घटनेची माहिती दिली. दुपारच्या वेळी ही `डबर डेकर` बस रस्त्याने धावताना पाहून इमारतीच्या टेरेसवरून,घराच्या बाल्कनीतून तर रस्त्याच्या कडेला हे दृश्य पाहताना डोंबिवलीकरांना आनंद वाटत होता.कोणीतरी आपल्या कॅमेऱ्याने हे दृश्य कैदहि केले असेल. काही वेळात बस पुन्हा इंदिरा चौकात आली आणि त्यानंतर आजतागायत पुन्हा `डबर डेकर` बस रस्त्यावर धावली नाही. परिवहन व्यवस्थापनाचा आणि मनसेचा हा प्रयत्न निकृष्ट रस्त्यामुळे प्
सन २०१३-१४ पालिकेच्या परिवहन समितीचे सभापती पद मनसेकडे आले. राजेश कदम यांची परिवहन सभापती पदभार स्वीकारल्यावर इरफान शेख, दीपक भोसले, आरिफ पठाण , भाऊसाहेब चौधरी, दत्ता खंडागळे, महेश जोशी , सुरेंद्र आढाव यांना एकत्र घेऊन परिवहन व्यवस्थापनास सहकार्य केले. इरफान शेख, बस यांत्रिक धुलाई मशीन, यांत्रिक टायर पंचर मशीन, कंडक्टरचा हातात असलेले आधुनिक तिकीट वेन्डींग मशीन, बस मधील जीपीएस सिस्टिम, वातानुकूलित बस गाड्या हे आणि असे अनेक आधुनिक कामे या काळात घडली, याला अत्यंत हुशार आणि दांडगी इच्छा शक्ती असलेले प्रशासकीय अधिकारी त्यावेळचे परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत याची जोड मिळाली. याच काळात परिवहन उपक्रमाचे सर्वात मोठे वार्षिक बजेट जे दोनशे कोटीच्या वर मंजूर झाले, परिवहन उपक्रमासाठी त्यावेळच्या सरकारने म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने त्यांची योजना होती.
जेएनएनयुआरएम ह्या योजनेतून परिवहन उपक्रमाला २०५ बस मंजूर झाल्या व संपूर्ण शहरात आधुनिक बस स्टॉप, पालिकेच्या डेपोंचा आधुनिकीकरण अशा काही गोष्टी व काही कामे मंजूर झाली व ती कालांतराने कार्यान्वित सुद्धा झाली, सुधीर राऊत व त्यांचे सहकारी अधिकारी कदम, आठवले, भोसले यांनी सुद्धा तेवढेच त्यासाठी मेहनत घेतली व इतर सर्व सहकारी कर्मचारी त्याच्यासाठी कार्यरत होते, त्यामुळे महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या खात्यात ज्या काही बस आहेत ही त्या वेळच्या आघाडी सरकारची देण आहे व या सर्व लोकांची मेहनत, जेएनएनयूआरएम (जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रेनेवल मिशन) जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरूत्थान योजना ही सध्याची "स्मार्ट सिटी" योजना आघाडी सरकारने पूर्णत्वास आणली असेही कदम म्हणाले.
Post a Comment